Monday, October 30, 2017

ईपीतर।

नाम्या सांगळूदकरला पयल्याछूट शाळत भर्ती केल्त तवाचं गुर्जीनं वळखलं की हे बेणं लय तापदायक ठरनार.पयलीचे समदे पोरं-पोरी बोंबलत व्हते आन् नाम्या तेंच्या खोड्या काडत व्हता.त्यानं गुर्जीलाबी सोडल न्हाई.टेबलावर ठिवलेला तेंचा रुमाल घेतला आन् तेंच्यात खडूचे तुकडे भरले. चेंडू तयार केला आन् गुर्जीलाचं मधल्या सुटीत कँच कँच खेळू म्हनला.गुर्जीचं टाळकं सरकल.ते काई बोलनार याच्या आत नाम्यानं आसं भोकाड पसरलं की सारी शाळा हार्दुन गेली.हेडमास्तर धावत आले.नाम्यानं गुर्जीकडं बोट दाकवलं.लेकराला हानल म्हणूनश्यान हेडमास्तरनं गुर्जीलाच झापलं.गुर्जीनं कानाला खडा लावला.पुना या बेन्याच्या नादाला लागायचं न्हाई.
       नाम्या वरगात आसताना गुर्जी परशन ईचारत नसत.हे ईपीतर काय उत्तर दिल याचा नेम नवता.एकदा गुर्जी भूगोल शिकवत व्हते.पाठ चांगला रंगात आला व्हता.गुर्जीनं एकदम ईचारलं,म्हारास्टाची राजधानी कंची ?पोरं-पोरी उत्तर द्यायच्या तयारीत व्हते.तर नाम्यानं तोंड उघडलं.म्हनला,खालल्या की वरल्या अंगाची,गुर्जी? गुर्जी परेशान.तेंला काय बोलावं ते कळेना.मंग नाम्याचं बोल्ला,तुमीचं म्हनले व्हते ना ते नागपूरचंबी  हिवाळ्यात काई तरी आस्त.गुर्जी गपगार पडले.
        नाम्या अभ्यास सोडून बाकी गोष्टीत एकदम फास्ट.वरच्या वरगात जात ऱ्हायला तसा समद्याच्या कामाला यायला लागला.गुर्जीचं मोबाईल रिचारज करून आन,हेडमास्तरचा डबा आन,मास्तरीनबाईच्या तान्हया लेकराला सांभाळ अशा कामात तो एकदम परफेक्ट.ते लेकरू तर नाम्याच्या येवड अंगावर व्हतं की नंतर ते बाईकडंबी जायना.
     नाम्या सांगळूदकरचे बा ईट्टल सांगळूदकर.तेंचं लान्डरीचं दुकान .चार बाय पाच आकाराच.पर गावाच्या एकदम मेन चौकात.'सांगळूदकर प्रेस अँन्ड लान्डरी'.दुकान दनक्यात चालनारं.ईट्टल सांगळूदकर लय काटकसरी गडी.एक बीडी ईझवू ईझवू चारदा पिनार.कदीमदी गीराईक येकाद कापड दुकानातच ईसरुन जायचं.परत यायचच न्हाई न्यायला. ईट्टल सांगळूदकर सा मईने जावू द्यायचे,मंग हळूचं ते कापड वापरायला काडायचे.आसचं एकदा एक भारी शरट गीराईक ईसरल व्हतं.तेनी ते सा मईन्यानी भायेर काडल.नाम्याला आवडलं म्हणूनश्यान तेला ते बारीक करून घालाया दिलं.नाम्या जाम खुश.शरट घालून शाळत गेला. हेडमास्तरनं वळकल.तेंचचं शरट।जाम भडकले.पर काय उपयोग,शरट ल्हान झाल व्हतं.
       इंगलीष म्हन्जी सांगळूदकर फँमीलीची खानदानी पारबलेम.कोनीबी धाव्वी पास झाल न्हाई.फकस्त इंगलीषमुळं. शाळात इंगलीष नस्त तर आमच्या खानदानीत कलेकटर,इनीशपेक्टर झाले आस्ते,ईट्टल सांगळूदकर कापडावर इसत्री मारत म्हणले.
    त्यादिशी पाचव्यादा नाम्याचा धाव्वीचा निकाल लाग्ला. इंगलीष फेल.पर नाम्या म्हनला आख्ख्या खानदानीत इंगलीषमधी समद्याच्या जादा मार्क पडले-धा।
    हे ईट्टलरावालाबी पटलं. म्हन्जी पसतीस मार्क घ्यायला आजून सांगळूदकर खानदानाच्या तीनचार पिढ्या जावा लागतील... नाम्या म्हनला आन् सारे हासले।
ब्यूटी पारलर ।

                नाम्या सांगळूदकरला पिरेम झालं आन् गड्याची दांडीचं गुल झाली.कशातबी ध्यान लागना.येऊनजाऊन डोळ्याम्होर सरदेसायाच्या नमीचाच चेरा झळकाया लाग्ला.पर तिला काई बोलायची डेरींगबी व्हईना.मंग नाम्यानं बापचं धार गेलेलं, पार खरवड झालेल दाडीचं बेलेड काढलं आन् पिक्चरच्या हिरोवानी बोट कापून घेत्ल.रगत याया लाग्ल,तसं नाम्यानं रगताला काडी लावत कागदावर "नमु,i Lowe you" खरडून त्येा कागूद शाळा सुटल्यासुटल्या नमीच्या हातात टेकीला.
       नमीबी लय भाद्दर.तिनं त्यो कागूद आपल्या बाला देवून टाक्ला.मंग काय ईचारता राव?सरपोतदार आरडाओरड करत डायरेक्ट नाम्याच्या घरी.तेनं आन् नाम्याच्या बानं पार चड्डी फाटूस्तर नाम्या बदडला.दुसऱ्या दिशी ती चिट्टी घेवून सरपोतदार शाळत हजर.तेंनी चिट्टी मास्तरला दाखवली.मास्तरनबी नाम्याला दोनदा बमकावलं.एकदा चिट्टी लिवली म्हणूनश्यान आन् दुसऱ्यांदा लवची पेलींग चुकीची लिवली म्हणूनश्यान.नाम्याच्या इज्जतीचा पार उकीरडा झाल्ता.समदे हासाया लाग्ले.नमीबी हाती लाग्ली न्हाई आन् इज्जतबी गेली.तेला लय जीव्हारी लाग्ल.मनाशी म्हनला आयच्यान जगन्यात काई राम न्हाई.त्या रातीला नाम्या तसाचं रडतरडत उपाशी झोपी गेला.
       
   दुसऱ्या दिशी त्यो लय उशीरा उटला.इज्जतीचा पार फालूदा झाल्ता. काय करावं ते तेला समजना. बा म्हनला,बास झाली तुही शाळा। नाम्यालाबी तेच पायजेन व्हतं.शाळात कधी आपलं डोकस् चालनार न्हाई हे तेला म्हाईत व्हतं.मास्तरबी येवूनजावून नाम्याला तेच सांगत व्हता.
    बा म्हनला दुकानात ध्यान घाल. वारकाचं दुकान. काय ध्यान घालायचं? समोर डोक्स आलं की भादर येवडचं बाला म्हाईत.समद्या फेशन खोट्या.जास्त दिस टिकत न्हाईत.डोकश्याची चंपी करनं सगळ्यात भारी फेशन.पारचीन काळापासून चालत आलेली ही फेशन.बा तेच्यात वस्ताद.म्हशीची आन् मानसाची सारकीच भादरनार.पर नाम्याला काई तरी येगळ करायची विच्छा व्हया लाग्ली.
         तेचं कारनबी तसचं व्हतं.नमीचा खटका काई नाम्याच्या डोक्शातून जात न्हवता.नमीला नटायची लय आवड.रोज नट्टापट्टा करनार आन् गावात फिरनार.ती दर हप्त्याला तालुक्याला ब्यूटी पारलरमंदी जाती आसं नाम्या समजलं आन् त्येची ट्यूब पेट्ली.
          त्यो लय डेरींग करून बाकडं गेला.बाला म्हनला, काई तरी येगळ करावं म्हनतू.पोरगं सोतावून काई तरी करायच म्हनतो म्हनल्यावर बाला आनंद झाल्ता.कर की लेका! काय करायच म्हनतू? बानं ईचारलं.गावात ब्यूटी पारलर सुरु करावं म्हनतो, नाम्या घाबरत घाबरत म्हनला.ते काय आसतं? बानं ईचारलं.जिंदगीभर वस्तरा आन् कैची बिगर दुसरं औजार म्हाईत नसलेला बा कोड्यात पडला.मंग नाम्यानं समजावून सांगितलं.पर नाम्या गावच्या पोरीबाळीचं डोक्स भादरनार म्हनल्यावर बाचं टाळकं सरकल.घरान्याची ईज्जत घालनार व्हय? बानं तेच्या कानाखाली जाळ काडला.
                     तवापासून नाम्या गपगुमान दुकानात बासोबत समोर आलेलं डोक्स भादरायचं काम करतू.पर नमीची आटवन झाली की ब्यूटी पारलर काडायचा ईचार काई नाम्याच्या डोक्शातून जात न्हाई...
                                                     @ विशाल तायडे

Sunday, October 22, 2017

This is not a review of any book or a comment on the books of any writer.Its mere a contemplation about the work and its impact on Indian writing today.With in few years,he has established his name in the literary arena of this country.He broke all traditional views about writers who write in English particularly.He says, rejections from publishers made him write more.His this statement caught my attention when I approached him first time and was reading his interview on social media.What a passion for writing! And dedication towards own work.
         His stories linger around the life of common people, specially those who lives in his surroundings.It makes his characters live in the novel. Settled in the one corner of the country and sketches social, economical and  geographical characteristics of the region so aptly make readers astonished.We travel through the pages of the novel with the writer.This is a mesmerizing experience to the readers.His narration is easy, language simple and events memorable.
         Five wonderful novels are in his credits so far.Two-three books have found their home in other languages also.He scripted his name on the major literary awards of the country.Today he is considered as a major voice of Indian pen.
           Just a day before,he was awarded with another important prize (Bangalore Literary Festival Award)for his new book,The small town sea.I passionately felt to write about him.That's all. Of course,he is Anees Salim!
                                            

Monday, October 16, 2017



लहानशा तांड्यावरचे विद्यार्थी,ज्यांची मातृभाषा मराठी नाही,अशा विद्यार्थ्यानी माझ्या लेखनावर व्यक्त केलेल्या या प्रतिक्रीया.हे घडवून आणणारे आणि हा युट्युब व्हिडीओ तयार करणारे बालकवी श्री. शिवाजी जाधव यांचे आभार..https://youtu.be/4NoWZpRvMhw